E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मराठवाड्यातील ६८० गावांत अतिवृष्टी
Samruddhi Dhayagude
30 May 2025
६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद
छत्रपती संभाजीनगर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात काही भागात मान्सूनचे देखील आगमन झाले असून. मागच्या चोवीस तासात मराठवाड्यातील ६८० गावांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर ३४ महसूल मंडळांत जोरदार पाऊस पडल्याने पावसाळ्यापूर्वीच दाणादाण उडाल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये गेल्या चोवीस तासांत दमदार पाऊस झाला. यामध्ये संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल ३४ महसूल मंडळांतर्गत असलेल्या सुमारे ६८० गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या गावांमध्ये ६५ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मे महिन्यातील १६ दिवस पावसाची नोंद झाली.
दरम्यान मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये १७ महसूल मंडळे जालना जिल्ह्यातील आहेत. तर मराठवाड्यात ६ मेपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मे मधील २८ पैकी १६ दिवस पावसाची नोंद झाली असून मागील २५ वर्षात मे महिन्यात इतक्या दिवस पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठवाड्यात यंदा मे महिन्यात सरासरी १७७ मिमी पाऊस पडला असून २७ ते २८ मे या दोन दिवसात सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत आठही जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला आहे.
जालन्यात सर्वाधिक पाऊस
दरम्यान विभागात सरासरी २३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ४४ मिमी पाऊस जालना जिल्ह्यात पडला आहे. या नंतर नांदेड जिल्ह्यात ३० मिमी, बीड जिल्ह्यात २६ मिमी, हिंगोली जिल्ह्यात २७ मिमी परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी २२ मिमी आणि धाराशिव जिल्ह्यात १० मिमी पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे पूर आल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सखल भागांमध्ये साचले पाणी
भिवंडीत बुधवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. एक तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने भिवंडीकरांची दैना उडाली होती. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. तर काही नागरिकांच्या घरात गटारीचे दूषित पाणी शिरल्याने पालिका प्रशासनाचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. शहरातील पद्मा नगर येथील श्रीरंग नगर व भद्रावती नगरमध्ये नागरिकांच्या घरात नाल्याचे दूषित पाणी शिरले आहे.
Related
Articles
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
पूंंछमध्ये दोन घरांची झडती
11 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
पूंंछमध्ये दोन घरांची झडती
11 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
पूंंछमध्ये दोन घरांची झडती
11 Jun 2025
काही क्षणांत होत्याचे नव्हते...(अग्रलेख)
14 Jun 2025
युध्द पातळीवर मदतकार्य : मोहोळ
13 Jun 2025
दक्षिण आफ्रिकेने जिंकला विश्वचषक
15 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
पूंंछमध्ये दोन घरांची झडती
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
5
दोघांची प्रकृती चिंताजनक
6
वाचक लिहितात